दहशतवाद पसरवणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘बंदी’ आणण्याची ‘या’ नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहशतवाद पसरविण्याचे काम सनातन संस्था करते. मालेगाव दंगलीत सर्व पुरावे असताना देखील प्रज्ञा ठाकूरला भाजपने खासदार केले हे अतिशय वाईट आहे. दहशतवाद पसरविणारा कोणत्याही समाजाचा असो त्याला शिक्षा व्हावी. राज्य सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मागण्या जोर धरु लागल्या आहेत.

हुसेन दलवाई म्हणाले की, नाणार, आरे आंदोलकांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाने आनंद झाला. भीमा – कोरेगाव प्रकरणात काही जणांना गोवण्याचा प्रकार सुरु आहे. त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या दोघांचा सहभाग भीमा-कोरेगावमध्ये होता. त्यांच्यामुळेच दंगली घडल्या. सांगलीच्या दंगलीवेळी जंयत पाटील यांनी भिडेंची बाजू घेतली होती. त्यामुळे मी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेऊ नये असे सांगणार आहे. भिडे-एकबोटे यांना अद्दल घडविली पाहिजे.

शिवसेनेने सनातन धर्म संस्थेला कधीही पाठिंबा दिला नाही. राज्यात शांतता ठेवायची असेल तर अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. काँग्रेसच्या काळात अंमलबजावणी झाली नाही ही आमची चूक होती. राज्यता आता पुरोगामी सरकार आले आहे. याबाबत आता स्पष्ट भूमिका घेतली गेली पाहिजे. दाभोळकर, पानसरे यांच्या सारखी माणसे मारल्या जातात. त्यांच्या मागे सूत्रधार कोणं आहे हे शोधून काढले पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरुन हे स्पष्ट होते. सरकार नक्की या संबंधात विचार करेल असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली. आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेतले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मागणी केली की, नाणार आंदलोकांवरील गुन्हे देखील मागे घ्या. त्यानंतर यावर सकारात्मक पाऊल उचलून उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकरणातील आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेतले. आता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

Visit : policenama.com