धक्कादायक… 40 पानांवर 40 वेळा मला सोडून जाऊ नकोस असे लिहून तरुणीची आत्महत्या 

बंगळुरूः वृत्तसंस्था
40 पानांवर 40 वेळा मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरचा प्रकार दक्षिण बंगळुरूच्या परिसरात घडला असून, पोलिसांना एका भाड्याच्या खोलीत  तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना 40 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यामधील प्रत्येक पानावर मला सोडून जाऊ नकोस असे लिहलेले आहे.

सुषमा बी. असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती बेल्लारी येथील रहिवासी असून, आयटी प्रोफेशनल असलेल्या के.मनीष कुमार याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला आहे.

 [amazon_link asins=’B07DD69LW4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03c67e7f-9bc6-11e8-b29a-637ce43eb74f’]
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीच्या सोबत राहणाऱ्या तरुणाने आठवडाभरापूर्वीच घर सोडले होते. त्यामुळे त्या तरुणावर हत्येचा संशय घेता येणार नाही. दरम्यान, हा तरुण आणि मृत तरुणी ज्या घराता राहायचे, त्या घराच्या मालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र घरमालकही पोलिसांना आपल्या भाडेकरूंविषयी अधिक माहिती देऊ शकला नाही.

के.मनीष कुमार या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मृत तरुणीच्या वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मनिषविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मनीष सोडून गेल्यानंतर ती मानसिक तणावाखालून जात होती, असी माहिती  तिच्या वडिलांनी दिली आहे.