Budget 2020 : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून बँक आणि ग्राहकांच्या रक्कमेबद्दल सर्वात मोठी घोषणा, जाणून घ्या
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेत वाढणाऱ्या घोटाळ्यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. पीएमसी बँकचे प्रकरण समोर आल्यानंतर लोकांमध्ये चिंता वाढली होती की बँक बुडाल्या तर त्यांनी बँकेत ठेवलेल्या रक्कमची हमी कोण घेणार ? बँकांमधील घोटाळ्यामुळे खातेदारांचे नुकसान होत होते. बँक खातेदारांना खात्यांच्या सुरक्षेसाठी डिपॉजिट इंश्योरेंस 1 लाख रुपये होता. त्यानंतर आज अर्थमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली की ही मर्यादा 1 लाखावरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
बँक डिफॉल्ट झाल्या तर काय –
DICGC म्हणजे डिपॉजिट इंश्योरेंस अॅण्ड क्रेडिड गारंटी कॉर्पोरेशनकडून नव्या नियमानुसार ग्राहकांना 5 लाख रुपयांची सुरक्षा गारंटी दिली आहे. हा नियम बँकेच्या सर्व शाखांना लागू असेल. यात मूळ रक्कम आणि व्याजाचा समावेश आहे. हे स्पष्ट आहे की मूळ रक्कम आणि व्याज 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फक्त 5 लाख रुपयांच्या रक्कमेची हमी घेऊन सुरक्षा दिली जाईल.
जमा रक्कमेला जोडले जाईल आणि फक्त 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा दिली जाईल. येवढेच नाही तर जर तुमचे एखाद्या बँक शाखेत एक किंवा त्यापेक्षा जास्त खाते आणि एफडी इत्यादी असेल तर बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांचीच सुरक्षा मिळेल. ही रक्कम कशा स्वरुपात मिळेल याची मार्गदर्शक तत्वे DICGC निश्चित करते.
अर्थमंत्री म्हणाल्या की पहिल्यांदा आम्ही 10 बँकाचे विलिनीकरण 4 बँकेत केले. त्यांना प्रतिस्पर्धी बनवण्याचा प्रयत्न केले जाईल. ते शेअर बाजारातून अतिरिक्त उत्पन्न जमा करु शकतात. आपल्या सर्व सरकारी बँकांची परिस्थिती उत्तम आहे. सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत.