मोदीच काय तर देशातील कोणतीही ताकद आरक्षणाला धक्का लावू शकणार नाही : पंतप्रधान

जमुई (बिहार) : वृत्तसंस्था – “मोदीच काय तर देशातील कोणतीही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू शकणार नाही.” त्यामुळे आरक्षण संपविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा या निवळ्ळ अफवा असल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जमुई येथे आयोजित सभेत केला. यावेळी मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून कॉंग्रसला लक्ष करत आरक्षणावर आपली भुमिका मांडली.
लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. आज बिहार येथील जमुई येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी अनेक डावपेच खेळले होते. आजच्या युवा पिढीला हा इतिहास माहित असायला हवा.’ असे वक्तव्य करत काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच आंबेडकर यांच्या पराभवात कॉंग्रेसचा हात असल्याचे सांगितले.