शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बेळगाव : वृत्तसंस्था – विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्दैवी घटना बेळगावातील रामदुर्ग तालुक्यातील के. तिम्मापूरमध्ये घडली. या घटनेत चौघांसह बैलजोडीचा मृत्यू झाला. रेवप्पा कल्लोळी (वय-३५) त्यांची पत्नी रत्नम्मा (वय-३०) मुलगा सचिन (वय-८) आणि भावाचा मुलगा कृष्णा यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

बुधवारी (दि.३) संध्याकाळी तिम्मापूरमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. विद्युत विभागाच्या कार्यालयाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे चौघांना आपले प्राण गमवावे लागेल असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

काल संध्याकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या. विद्युत खात्याच्या कार्यालयाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला जात आहे. कल्लोळी कुटुंबीय सकाळी शेतावर निघाले होते. त्यावेळी तुटून पडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श या चौघा जणांना झाला. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला. विद्युत विभागाची हलगर्जी चार जणांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.