बेंगळुरू: व्हॉट्सअॅप अफवेचा अजून एक बळी

बेंगळुरू: वृत्तसंस्था

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच मुले चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांवरून निर्दोष लोकांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. या अफवा थांबविण्यासाठी केंद्र सरकारने याबाबत पाऊलही उचलले आहे. मात्र अजुनहीअशा अफवांमुळे निर्दाेष लाेकांना प्राण गमवावे लागत अाहेत. अशीच एक घटना कर्नाटकातील बिदरमध्ये घडली आहे. एका गुगल इंजिनीअरला चाेरीच्या अफवेवरुन जमावाने बेदम मारहान केली यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तर तिघांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोहम्मद आजम अहमद असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a32adf24-8810-11e8-a52e-c5355cad958e’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिदरच्या मुरकी येथे राहणाऱ्या बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी मोहम्मद बिदरला आला होता. मित्रांचा निरोप घेत असताना त्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट दिले. त्याचवेळी व्हॉट्सअॅपवर मुलं चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र जमून या चारही जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

याबाबत पाेलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने गर्दीत घुसून जमावाला पांगवले आणि या तरुणांची जमावाच्या ताब्यातून सोडवणूक केली. या चारही गंभीर जखमींना बिदरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. तसेच व्हॉट्सअॅपवर मुल चोरी झाल्याची अफवा पसरविणाऱ्या ग्रुप अॅडमिनलाही अटक करण्यात आली आहे. शिवाय व्हॉट्सअॅपवर मुलं चोरी झाल्याचे बनावट फोटो टाकणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.