‘इन्शाल्लाह’ मधून सलमानचा पत्ता कट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे तब्बल २० वर्षानंतर सलमान खान सोबत चित्रपट करणार होते. इन्शाअल्लाह या चित्रपटाच्या निम्मिताने सलमान खान सोबत काम करण्याचा योग्य येणार होता. परंतु या दोघांमध्ये असे काही घडले ज्यामुळे हा चित्रपट होणार कि नाही असेच वाटू लागले आहे. या चित्रपटात सलमान आणि आलीया भट यांची जोडी दिसणार होती. आता नवी माहिती समोर येत आहे त्यानुसार संजय लीला यामध्ये असे काही बदल करत आहे जेणे की, सलमान खानला रिप्लेस केले जाणार आहे.

आलिया साठी चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये बदल
मिळालेल्या माहितीनुसार, भन्साळी आलीया भट यांना चित्रपटात कायम ठेवणारआहेत. त्यासाठी ते चित्रपटाच्या स्क्रिप्ट मध्ये कधी बदल करत आहेत. या चित्रपटावर खूप पैसे लावले गेले आहेत त्यामुळे हा चित्रपट झाला पाहिजे असे भन्साळी यांचे म्हणणे आहे. मध्ये अशी बातमी आली होती कि, आलिया ने या चित्रपटासाठी काही शूटिंग सुद्धा केले आहे. कदाचित त्यामुळेच हा चित्रपट होणार नसल्याचे ऐकून ती नाराज होती. पण आता भन्साळी यांच्याकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ती थोडा आधार भेटला असणार.

‘जानम समझा करो’ सारखेच कथानक
‘इन्शाल्लाह’ या चित्रपटाचे कथानक भन्साळी यांचाच एक जुना चित्रपट ‘जानम समझा करो’ या चित्रपटासारखा आहे. ‘जानम समझा करो’ मध्ये सलमान खान सोबत उर्मिला मातोंडकर यांनी काम केले होते. निर्मात्याच्या आणखी एका सूत्रांकडून असे समजले की, ही एक सलमान खान ने अभिनय केलेली एक कहाणी आहे. ज्यात ४० पेक्षा जास्त वय असेलला व्यावसायिक आपल्या आयुष्याबद्दल एवढा जास्त गंभीर नसतो. त्याचे वडील त्याला केवळ एका शर्थीवर पूर्ण संपत्ती देणार असतात. ती शर्थ म्हणजे, त्याने प्रेमात पडले पाहिजे आणि आपली जीवनशैली बदलली पाहिजे. अशा प्रकारची चित्रपटाची कथा होती.

आरोग्यविषयक वृत्त –