सावरकरांना भारतरत्न देणे म्हणजे शहिदांचा अपमान, कन्हैयाकुमार यांचे मत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – इंग्रजांकडे माफी मागणा-या, गांधी हत्येत सहभाग असल्याचा आरोप असलेल्या सावरकरांना भारतरत्न दिला, तर देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा अपमान ठरेल, असे परखड मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल
सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

कन्हैयाकुमार म्हणाले की, भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे. महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये ज्या सावरकांराचा सहभाग होता, त्यांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे. हे भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून आवाज दाबला जात आहे.

सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वत:कडील पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत
आहेत. सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती दाखविली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांची चर्चा करून सध्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या लोकांना ईडीची भीती दाखवून घाबरवले जात आहे. ही हुकूमशाहीचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी