शेतकर्‍याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील भोजनगर येथे उघडकीस आली. वसंता चंदू राठोड (वय ४५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

वसंता राठोड यांनी दोन एकरात कपाशीची पेरणी केली होती. त्यानंतर काही कारणास्तव दुबार पेरणी करावी लागल्याने डोक्यावर कर्ज झाले. या विवंचनेतून २३ डिसेंबरला ते घरातून निघून गेले. मात्र, शनिवारी (२६ डिसेंबर) त्यांचा मृतदेह पैनगंगा नदीपात्रात आढळून आला.

ही माहिती मिळताच पोलीस पाटील वंदना राठोड, तलाठी ताई दवणे, कोतवाल वासुदेव जूकोटवार यांच्या उपस्थितीत मच्छिमारांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, कर्जबाराजीपणाला कंटाळून वसंता राठोड यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.