राज्यात लवकरच अँटी व्हायरल औषध येणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात अँटी व्हायरल औषधी लवकरच येणार असून आम्ही त्याची वाट पाहत आहोत. सिपला कंपनीने लवकर औषध देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबाद येथे नुकतीच दिली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव येथील परिस्थिती चिंताजनक आहे.

औरंगाबाद घाटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात येणार आहे. 10 प्लाझ्मा थेरपीमधील 9 थेरपी यशवी झाल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणारे औषधाचा मुबलक पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. खासगी दवाखान्यात आव्वा ते सव्वा बिल आकारता येणार नाहीत. तसेच वरिष्ठ पदस्थ डॉक्टरांनी कोरोना आयसीयूमध्ये प्रत्येक तासाला लक्ष घालावे, अशा सूचना देखील राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

औरंगाबादेत नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक रावसाहेब आमले यांचा बुधवारी पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावसाहेब आमले यांच्यावर प्लाझ्मा थेरपी होणार होती. मात्र, थेरपीआधीच त्यांच्यावर मृत्यू ओढावला.

औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद पालिका हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झाले आहेत. 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू तर सध्या 3141 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.