महाराष्ट्र शासनाचे आदेश जारी ! आता ऑफिसमध्ये फक्त 50 % उपस्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य शासनाने आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा आणि आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र सोडून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्यासंदर्भात राज्य शासनाकडून आदेश जारी केले गेले आहेत.

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने १७ मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं असून. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोनाची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कठोर निर्बंध लागू होत असल्याचं दिसत आहे. तसेच, नाट्यगृहे आणि सभागृहे येथेही ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तर त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा अन्य कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले.

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सहीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारा तापमान तपासण्यात येईल, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्य सरकारने काढलेला हा आदेश ३१ मार्चपर्यंत अंमलात येणार असून परिस्थिती पाहता त्यानंतर पुढील आदेश निश्चित करण्यात येतील, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.