मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या आघाडीचा परिणाम पालिकेतही पाहायला मिळाले आहेत. शिवसेनेने अवघ्या अडीच वर्षात भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे.
महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या लिलाबाई आशान यांना भाजपच्या काही नगसेवकांनी मतदान केल्याने आणि राष्ट्रवादीनेही तसेच टीम ओमी कलानी पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 43 मतं मिळाली तर भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार जीवन ईदनानी यांना 35 मतं मिळाली.
उल्हासनगर महापालिकेत 2017 मधील निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला सोबत न घेताच पहिल्यांदा टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने कलानी कुटुंबाच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेशी जवळीक वाढवली होती. भाजपने व्हीप बजावलेला असतानाही नगसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली. पालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांना महापौर पद देण्याची तयारी दर्शवली होती.
Visit : Policenama.com
- सौंदर्य वाढविण्यासाठी ‘हा’ बिनपैशाचा, सोपा उपाय! हे आहेत ८ फायदे
- हिवाळ्यात ‘स्ट्रॉबेरी’ खाल्ल्याने होतील ‘हे’ ९ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- चिंतामुक्त होण्यासाठी खेळा कोणताही खेळ! ‘हे’ आहेत ५ फायदे
- तणाव घालवायचा असेल तर ‘स्विमिंग’ला जा, हे आहेत ४ फायदे
- मधुचंद्राच्या रात्री का पितात दुध, माहित आहे का? ‘ही’ आहेत ३ कारणे
- ‘टेन्शन’ कमी करण्याचे ‘हे’ आहेत ५ उपाय, आपोआप होईल गायब
- आरोग्यदायी आहाराविषयी आहेत ‘हे’ ३ गैरसमज, होतील ‘हे’ ५ फायदे
- कॅलरीजचे सूत्र माहीत असेल तर आरोग्य राहिल उत्तम, ‘हे’ ५ नियम पाळा
- जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक, आरोग्यासाठी ‘हे’ आहेत ७ धोके!
- …अन्यथा वजनावर राहणार नाही नियंत्रण! ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा