Bigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप होताच राखीने करण कुंद्राला दिलं कडाडून उत्तर, म्हणाली…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 ची टीआरपी वाढवण्यासाठी मागील सिझन्समधील 3 अभिनेत्रींची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली. यामध्ये रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावतं (Rakhi Sawant) आणि देवोलिन भट्टाचार्यजी (Devoleena Bhattacharjee) यांचा समावेश आहे. या तिघींना व्हिआयपीचा टॅग देण्यात आला आहे. तर व्हिआयपी खेळाडू घरात आल्यापासून नाॅन व्हिआयपीवर सतत निशाणा साधत आहेत. (Bigg Boss 15)
बिग बाॅस 15च्या (Bigg Boss 15) घरात राखीचा पती रितेशने देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तर रितेश देखील व्हिआयपी एन्ट्री मध्ये मोडतो. यादरम्यान रितेशने तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि करण कुंद्राच्या (Karan Kundra) नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर करणने प्रत्युत्तर देत राखी सावंतसोबत लग्न करुन रितेश पळून गेला, असल्याचं म्हटलं आहे.
बिग बाॅसच्या घरात बाॅलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाची (Neha dhupia) आदालत लागली असताना करणने रितेशला उत्तर दिलं. ज्यावर राखी प्रचंड भडकली असून तु तुझ्या प्रत्येक प्रेयसीला धोका देतो, रितेश दोन वर्षानंतर आला ते माझी पर्सनल लाईफ आहे, असं राखीने यावेळी म्हटलं आहे.
नेहा धुपियाच्या अदालतमध्ये रितेशला उत्तर देताना करणने त्याच्यावर दुबलेपणाचा टॅग लावला.
तसेच यावेळी राखीपेक्षा जास्त रितेश बिझनेस स्टाॅकला मूल्य (Value) देतो, असं देखील करण म्हणाला.
यानंतर करण आणि रितेशमध्ये चांगलाच वाद पेटला.
Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 karan kundrra and rakhi sawant husband riteish had ugly fight
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर