Bihar Political Crisis | ‘महाराष्ट्रात शिवसेना विश्वासघाताचे परिणाम भोगतेय’, भाजपचा नितीश कुमारांना इशारा
पाटणा : वृत्तसंस्था – Bihar Political Crisis | बिहारमध्ये आज मोठी राजकीय घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजप (BJP) आणि एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय (Bihar Political Crisis) घेतला. त्यांनी राजद (RJD) आणि महागठबंधनासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर भाजपनं त्यांना महाराष्ट्राचा (Maharashtra) दाखला देत इशारा दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेनं (Shivsena) आमच्यासोबत विश्वासघात केला त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय, असं भाजप नते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी म्हटलं.
सुशील मोदी म्हणाले, नितीश कुमार यांना आरजेडीमध्ये तो मान मिळणार नाही जो भाजपसोबत असताना मिळालाहोता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री (CM) केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत, असा थेट इशारा मोदी यांनी नितीश कुमार यांना दिला.
He (Nitish Kumar) won't get that respect with RJD that he got while being with BJP. We made him CM despite having more seats & never tried to break his party. We broke only those who betrayed us. In Maharashtra, Shiv Sena betrayed us & faced consequences: BJP RS MP Sushil Modi pic.twitter.com/8fBexF7esc
— ANI (@ANI) August 9, 2022
बिहारमध्ये ‘तेजस्वी’ पर्व
बिहारमध्ये नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि
आरजेडीचे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राजभवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
आता या महाआघाडीचा शपथविधी (Swearing In) सोहळा बुधवारी (दि.10) म्हणजे उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाटणा येथे दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम होईल. नव्या सरकारला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.
Web Title :- Bihar Political Crisis | shivsena betrayed us faced consequences bjp warning to nitish kumar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ