पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थामधील बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यात ४८ तासांत पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याच्या आदेश दिला आहे. गौतम यांच्या या दशामुळे बिकानेर जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला राहता येणार नाही. गाैतम यांनी जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू केले आहे. याशिवाय राजस्थानमधील सर्व हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहण्यास कुमार पाल गौतम यांनी बंदी घातली आहे असेही समजत आहे.
गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. याशिवाय अनेक जवान जखमीही झाले. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच होत्या. सोमवारीही दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलिना परिसरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दल यांच्यात तब्बल १६ तास चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह ४ जवान आणि एक पोलीस शहीद झाला आहे. यात राजस्थानचे एस.राम जे जवानही शहीद झाले आहेत. राम शहीद झाल्याची माहिती समजल्यानंतर राजस्थानमध्येही संतापाची लाट उसळल्याचे चित्र दिसत आहे.