जगाला ‘कोरोना’ची लस पुरवण्यात भारत ‘सक्षम’, बिल गेट्स यांना ‘विश्वास’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसविरोधातील लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आटापिटा करीत आहेत. बहुतेक देशांच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या असून काही देश मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. भारताही दोन औषध कंपन्यांच्या लशींना ह्युमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे. कोरोनावरील लस तयार झाली तर फक्त स्वत:पुरतीच नव्हे तर संपूर्ण जगाला लस पुरवण्याची क्षमता भारताकडे आहे, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे.

कोविड-19: इंडिया वॉर अगेन्स द व्हायरस या डॉक्युमेंटरीमध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे सहप्रमुख आणि ट्रस्टी बिल गेट्स यांनी भारताबाबत विश्वास दाखवला आहे. भरमसाठ लोकसंख्या आणि शहरी केंद्र यामुळे आरोग्य संकटाच्या मोठ्या आव्हानाचा सामना भारताला करावा लागतो असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये खूप क्षमता आहे. इथल्या औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या संख्येने पुरवठा करतात. सर्वात जास्त लशी भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. भारतील औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात लशीचा पुरवठा करतात. सीरम इन्सिट्युसारख्या मोठ्या कंपनीप्रमाणेच बायो, भारत बायोटेकसह कित्येक कंपन्या कोरोनावरील लस बनवण्यात मदत करत आहेत या कंपन्या फक्त स्वत:च्या देशापुरते नाही तर संपूर्ण जगासाठी लस निर्माण करतील याबाबत मी उत्सुक आहे. मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे खूप गरजेेचे असल्याचे गेट्स म्हणाले.