…अन् ‘त्या’ रात्री कायमची संपली ‘ऐश्वर्या-सलमान’ची लव्हस्टोरी

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली लव्हस्टोरी म्हणजे ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) व सलमान खानची (Salman Khan) यांची लव्हस्टोरी (Love Story) होय. आजही या लव्हस्टोरीचे किस्से चर्चेत आहेत. सलमान प्रेमाच्या आगीत असा काही होरपळा की, बघता बघता हिरोचा विलेन बनला. एकेकाळी ऐश्वर्या व सलमान एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असत. पण आज दोघेही एकमेकांचे नाव घेणेही टाळतात. आज ऐश्वर्या रायचा वाढदिवस. अशात तिच्या व सलमानच्या लव्हस्टोरीचा हा किस्सा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना आहे 1999 सालातील एका रात्रीची. या रात्री असे काही घडले की, सलमान व ऐश्वर्याचे नाते कायमचे संपुष्टात आले. सलमान व ऐश्वर्या जवळपास तीन वर्षे एकत्र होते.1997 साली या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी ऐश्वर्या इंडस्ट्रीत नवखी होती. याच काळात सलमान तिच्या आयुष्यात आला. खरे तर सलमान त्यावेळी सोमी अलीच्या प्रेमात होता. तिच्यासोबत लग्नही करणार होता. पण ऐश्वर्याला पाहिले आणि तिच्यासाठी तो असा काही वेडा झाला की, सोमीला सुद्धा विसरला. असे म्हणतात की, सलमानने ऐश्वर्याच्या करिअरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ऐश्वर्याला हम दिल दे चुके सनम मिळाला तोही सलमानच्या शिफारसीमुळेच मिळाली होती.

एक दिवस अर्ध्या रात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा ठोकू लागला. सलमान प्रचंड रागात होता आणि ऐश्वर्या दरवाजा उघडत नव्हती. पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्याच्या दरवाज्यावर जोरजोरात थापा मारत होता. त्याच्या हातातून रक्त येऊ लागले.दोन-तीन तास हा ड्रामा सुरु होता. अखेर ऐश्वर्याने दरवाजा उघडला आणि सलमान घरात गेला.

इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, दोघांच्या नात्यात कटुता येण्यामागचे कारण होते लग्न. सलमानने लग्नसाठी तगादा लावला होता. पण ऐश्वर्या त्यासाठी तयार नव्हती. तिला करिअरवर फोकस करायचा होते. काही लोकांच्या मते, सलमान व ऐश्वर्याच्या ब्रेकअपसाठी सोमी अली जबाबदार होती. सोमीच्या वडिलांची प्रकृती बरी नव्हती. अशात तिने मदतीसाठी सलमानला फोन केला आणि सलमानही तिचा फोन येताच तडक अमेरिकेला पोहोचला होता. ऐश्वर्याला ही गोष्ट खटकली होती. याच कारणामुळे तिने सलमानसोबत ब्रेकअपचा निर्णय घेतला.