पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची गोष्ट असे म्हणत. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच नाव न घेता टोला लगावला आहे. नगराचे राजे बॉलीवू़ड कसे वाचवायचे याच्या चिंतेत अशी टीका त्यांनी केली आहे.
शेलार यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, आटपाटनगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची गोष्ट, महाराष्ट्र नावाच्या समृध्द राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातले आहे. शेती, गुरे, घरे सारे काही उध्दवस्त, . शेतकर्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पुर, तेंव्हा नगरचे राजे बॉलीवड कसे वाचवायचे यात चिंतातूर झाले आहेत.
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय..
त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना..
पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून"नाईटलाईफची"काळजी "राजपुत्र" करीत आहेत..दुर्दैवी चित्र..
"महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाची धााव करणारी जनता आता तरी मंदीरे उघडा असा आर्जव करत आहे. तर दुसरीकडे नगरात कोणीही मागणी केलेली नसताना पब, बार, रेस्टारेंट, रात्री 11.30 पर्यंत खुली ठेऊन नाईटलाईफची काळजी राजपुत्र करत आहेत .
आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट..
महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर..
तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले!
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
बॉलीवूडला संपविण्याचे किंवा इतरत्र हलविण्याचे प्रकार होत आहेत ते कदापी सहन केले जाणार नाहीत, अशा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी दिला. अभिनेता सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलीवूड कलाकारावर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावे घेतली जात आहेत. बॉलीवूडमधील या वादावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल मौन सोडल