भाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग अन् किडनॅपिंग करून वर आले : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करुन भाजप (BJP) पक्ष वर आला असून चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप (BJP) शिवसेनेसोबत इतकी वर्ष होती. ज्यांच बोट धरुन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले होते. आता शिवसेना चांगलं काम करू लागली तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला असल्याची टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात संबोधित करताना शेख यांनी भाजपचा सडकून समाचार घेतला. यावेळी शेख यांनी नवी मुंबईतील विकास कामांवरुनही भाजपवर टीका केली. गेल्या दहा-बारा वर्षात नवी मुंबईकरांसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने केवळ खाण्याचे काम केले आहे. आम्ही आश्वासन देतो. इथल्या भूमिपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी नक्की निर्णय घेऊ. नवी मुंबईसाठी कसं बंदर विकसीत केल जाईल, यावर कॅबिनेट बैठकीत लवकरच निर्णय घेऊ, असे शेख म्हणाले.