छत्रपतींचा ‘अपमान’ सहन करणार नाही, भाजपचा संजय राऊतांवर ‘पलटवार’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरवा मागितला. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला असा पलटवार भाजपने केला आहे. राऊत यांचे वक्तव्य मस्तवालपणाचे प्रतिक आहे अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजप आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसून येत आहे. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाशी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहमत आहेत का याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल असेही पाटील यांनी म्हटलं आहे.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल तर ते आपण समजू शकतो. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नसल्याने थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजाबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –