देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना ‘शब्द’, म्हणाले – ‘त्या’ 100 लोकांची यादी द्या, कारवाई होईल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी आठ साडे आठ च्या दरम्यान ईडी तीन पथके तसेच तपासासाठी पोहोचली त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन पुत्र आणि त्या कार्यालयात तपास सुरू केला आणि नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास आहे करत आहे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांना देखील तिकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत त्यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे याचा तपशील आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरी देखील ईडी पथक दाखल झाला आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही अधिकारी पोहोचले.

दरम्यान, सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणेचा गैरवापर महाविकासआघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस नक्की काय म्हणाले…
कुणीतरी तक्रार केल्याशिवाय किंवा काहीतरी मटेरियल असल्याशिवाय ईडी कोणावरही धाड टाकत नाही. ईडीकडे नक्कीच काहीतरी पुरावे असतील, एखाद्यानं चूक केली नसेल तर त्याला ईडीच्या छाप्याला घाबरण्यांचं काही कारण नाही. चूक झाली असेल तर कारवाई होईलच. या संपूर्ण घडामोडींची माहिती माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल.

शिवसेना खासदार संजय राऊत थेट आवाहन…
ईडीने कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकले असं मी ऐकलेलं नाही. मी शंभर माणसांची यादी ईडीला देतो. ईडीने त्यांच्यावर कारवाई करून दाखवावं.

त्यावर देवेंद्र फडणीस यांनी भाष्य केलं. “राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्यावी. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे. ”

आह्मी कोणाच्या बापाला घाबरत नाही ; शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकासआघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाही. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे मात्र अशा कारवाई करून पुढची पंचवीस वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांचावर ईडीने केलेल्या केलेल्या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने कारवाई केली. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकासआघाडीचे सरकार मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे.