भाजपची जोरदार टीका, म्हणाले – ‘पोलिस हुकुमशाही ठाकरे सरकारच्या दबावात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात मनसुख हिरेन प्रकरणावरून एक वेगळं वळण लागलं असून, सचिन वाझेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेला भाजप राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. तर यावरून ठाकरे पोलिस दलात केलेल्या फेरबदलावर टीका करत कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा धरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. तर भाजपने एक ट्विट करत ठाकरे सरकारचा उल्लेख हुकुमशाही ठाकरे सरकार असा केला आहे.

भाजपने ट्विट करत म्हटले आहे. फेरबदल म्हणजे पोलिसांवरील दबाव असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. मुंबई पोलिस यांचं जगात नाव आहे, अशा पोलिस दलावर आता जेवढा दबाव आहे तेवढा दबाव कधीही आला नसेल. तसेच, इतकंच नाही तर, पूजा चव्हाण प्रकरण, अँटिलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरण प्रकरणांवरून ठाकरे सरकारचा उल्लेख हुकुमशाही ठाकरे सरकार असा करत, अशा सरकारच्या दबावात मुंबई पोलिसांना नको की कामं करावी लागत असल्याचे भाजपने म्हटलं आहे. तर हे सरकार पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं काम करतंय. तसेच अनेक प्रकरणं हे सरकार दाबण्याचं पाप करत असल्याचे जोरदार आरोपही भाजपने केला आहे.

भाजपाचा गृहमंत्र्यांना प्रश्न –

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. सचिन वाझे यांची नेमणूक तुम्ही चालवून घेतलीत, मग आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही, असे सांगितल्यामुळे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली का?, मनसुख हिरण यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझे यांच्यावर काहीच कारवाई कशी झाली नाही?, एनआयएची चौकशी सुरू होईपर्यंत सचिन वाझेंना सांभाळून घेण्याचे तुम्हाला आदेश होते का?, इतके भयंकर कट रचणाऱ्याच्याच हाती तपास कसा काय दिला गेला?, चोराच्या हाती चाव्या देण्याइतके आपण मजबूर का झालात गृहमंत्री?, असे अनेक जोरदार प्रश्न भाजपने केला आहे.