स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष २०४७ पर्यंत राहणार भाजप सरकार ; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा विश्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजप नेत्यांनी आता भविष्यवाणी देखील करण्यास सुरुवात केली आहे. अशीच भविष्यवाणी भाजपचे जेष्ठ नेते राम माधव यांनी वर्तवली आहे. त्रिपुरातील अगरताळा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, देशात काँग्रेसने सर्वात जास्त काळ राज्य केले आहे. त्यामुळे आता त्यांचा हा विक्रम मोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार असून २०४७ म्हणजेच स्वातंत्र्याची शंभरी गाठेपर्यंत भाजपच सत्तेवर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना राम माधव म्हणाले की, १९५० ते १९७७ पर्यंत कॉंग्रेस सत्तेत होते. आता भाजप त्यांचा विक्रम मोडेल. जेव्हा स्वातंत्र्याची शंभरी साजरी करत असेल तेव्हा भाजप सत्तेत असेल. २०४७ पर्यंत देशात भाजपा सत्तेत राहील असा दावा त्यांनी केला आहे. रविंद्र सातवार्सी भवन येथे पक्षाच्या विजय रॅलीला संबोधित करीत असताना त्यांनी हे म्हटले आहे. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी कधीही सैन्याच्या नावाचा वापर केला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षात आम्ही भ्रष्टाचार आणि जातीय वाद मिटवण्यास सक्षम राहिल्यामुळेच लोकांनी आम्हाला पुन्हा सत्ता दिली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे सरकार खूप काळापर्यंत देशावर राज्य करेल आणि देशाला प्रगत बनवणे आणि जगाच्या नकाशावर देशाचे नाव मोठे करणे हेच आमचे ध्येय असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रभक्ती आमच्या रक्तात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
Ram Madhav, BJP in Tripura: If there's any party which has been in power for longest duration, it's Congress – from 1950 to 1977. I assure you that Modi ji is going to break that record…There will be BJP in power till the time we enter 100th yr of independence in 2047. (07.06) pic.twitter.com/deWi8s8FjB
— ANI (@ANI) June 8, 2019