चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उध्दव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं’

पोलिसनामा ऑनलाइन – आम्हाला राष्ट्रवादी ही नको आणि शिवसेना ही नको. आता आम्हाला आमची ताकद पाहायची आहे. आमचं संघटन मजबूत झाला आहे हे माझं मत आहे तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल. शिवसेनेसोबत आता जाणार नाही. असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही; मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते? प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धव ठाकरेंना या प्रश्नांचा अभ्यास नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे हेही माहीत नव्हतं. कामकाज कसं होतं हे माहीत नाही, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे बोलताना ते म्हणाले, की मी स्वतः शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वतः भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं त्यांचं कौशल्य खरोखर मोठं आहे. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्गार काढले. मात्र, शेती, साखर या गोष्टीतील त्यांच्या एवढा अभ्यास कुणाचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केला आहे शरद पवार साहेबांना राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळे यांना नेतृत्व करण्यास सांगतील. असं माझं विश्लेषण आहे ते चुकीचे नाही त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावंसं वाटणे चुकीचे नाही.

वीजग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचार विनिमय सुरू आहे- राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत

“वीज बिल माफी हे केवळ एका खात्याचं काम नाही हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. त्यानंतर वाढीव बिल माफी करू, अशी घोषणा मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून केली होती. वीज बिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतं. तो सरकारचा निर्णय होता वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आज विचारविनिमय सुरू आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीज बिल भरले. पण जनतेला सांगतात बिल भरू नका हा कुठला न्याय आहे ? “