फडणवीसांचं उध्दव ठाकरेंना खुलं ‘आव्हान’, म्हणाले – ‘हिंमत असेल तर चला पुन्हा जनतेच्या कोर्टात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले की, ‘तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढू, आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू.’ आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवशेनात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना धारेवर धरले आणि जोरदार टीका देखील केली. तसेच त्यांनी आव्हान दिले की ‘सावरकरांवर जे कुणी टीका करायचे त्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेस्तनाबूत करत असे. मात्र आता काँग्रेस सऱ्हास सावकरांचा अपमान करते. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,’ असं देखील ते म्हणाले.

जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :

एल्गार परिषदे प्रकरणी एनआयएकडे चौकशी गेल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

सत्य बाहेर येऊ नये म्हणून एसआयटी स्थापन करायची होती

चंद्रकांत दादांचा प्रवास म्हणजे थक्क करणारा

आपल्या पक्षात कोणतीही गोष्ट कष्टाने मिळते

एका सामान्य घरातील व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होतो हे फक्त भाजपातच होऊ शकतं

भाजपात मिळणारं पद हे शोभेची गोष्ट नसून भाजपात पद म्हणजे जबाबदारी

आपल्या पक्षात सत्ता म्हणजे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं माध्यम

कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर कोणतंही युद्ध जिंकतो

प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत

कलम ३७० हटवल्यामुळे २६ जानेवारीला जम्मू काश्मीरच्या प्रत्येक चौकात भारताचा तिरंगा लागला. या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत

अयोध्येत होणार प्रभू श्रीरामांचं मंदिर

अनेक लोक अयोध्येत जाणार आहेत, उद्धव ठाकरेंना खोचक टोला

अयोध्येत गेल्यावर तुमचं हिंदुत्वाचं रक्त सळसळेल

– CAA : शेजारच्या देशात अल्पसंख्यांकांना अत्याचार सहन करावे लागले. अशा पीडीतांची आपल्या देशात ३० – ४० वर्षं ना इधर के ना उधर के अशी अवस्था झाली. अशा लोकांना नागरिकता मिळवून देण्याचा कायदा केला तर मोदीजींनी काय चूक केली ?

काही जण सत्तेत येण्यासाठी काहीही करायला तयार आहेत

लोकांमधे रोज, खोटं बोल, रेटून बोल असं करत आहेत

पवार म्हणाले भटक्या विमुक्तांच्या मनांत भीती आहे. हा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आहे. सीएएचा परिणाम अशा कोणावरही नाही हे पवारांना माहिती आहे

मोदींनी जाती आणि जमातींना आरक्षण देण्याचं काम केलं

येणाऱ्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी बचावात्मक धोरण स्वीकारू नये

जनादेशाचा झाला विश्वासघात

विश्वासघात झाला म्हणून रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत

बाळासाहेबांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवेल असं तुम्ही वचन दिले होतं का उद्धवजी ?

– CAA आपला डीएनए विरोधी पक्षाचा आहे

या सरकारला जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही