‘आपण पक्ष सोडल्याने काहीही फरक पडणार नाही’, गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

पोलीसनामा ऑनलाईन  – आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असे होत नाही, असा टोला भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी (bjp-leader-girish-mahajan) एकनाथ खडसे (eknath-khadse) यांना लगावला आहे. भाजपा हा मोठा पक्ष असून आजवर भाजपातून अनेक जण गेले आणि आले. त्यामुळे पक्षाला कोणताही फरक पडला नाही. भविष्यातही भाजपा हा पक्ष वाढतच जाईल. मी आहे म्हणून पक्ष असल्याचे म्हणणारे आता इतिहासजमा झाले आहेत. आजही जे भाजप सोडत आहेत, त्यांचीही दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले.

भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर महाजन पत्रकारांशी बोलत होते. आजही भाजपाच्या ताब्यात 80 टक्के महानगरपालिका आहेत. त्यामुळे कोणी मागणी केली तर त्या महापालिका सरकार बरखास्त करणार आहे का ? अवास्तव मागणी करून प्रसिद्धी मिळवणं हेच सध्या काम दिसत आहे. याविषयी चर्चा करणंही योग्य वाटत नाही.

सध्या खडसे आणि महाजन यांच्यात शाब्दीक चकमक सुरू आहे. मुक्ताईनगरमध्ये भाषणादरम्यान खडसे यांनी पुढील काळात कोण किती सक्षम आहे आणि कुणाच्या मागे किती लोक आहेत हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचे म्हटले होते. यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार, खासदार तर सोडा, एकही निष्ठावंत कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही. पक्षाच्या मागे कोण आहे हे येत्या काळात दिसणार आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणत आहे याला महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल आहे.

एका विचारधारेवर पक्ष चालत असून पक्ष वाढविण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतल्याचं महाजन यांनी सांगितले. मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्या. या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केल आहे.

भाजपासोबतच राहणार : रक्षा खडसे( raksha-khadse)
रक्षा खडसे यांनी आपण भाजप विचारसरणीत वाढलो असून चार वर्षांत खासदारकीचे तिकीट मिळो ना मिळो, आपण भाजप सोबतच राहणार, असे स्पष्ट केले आहे.