Delhi Violence : केजरीवाल दंगलखोरांना वाचवत आहेत, भाजपच्या कपिल मिश्रांचा आरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. आपल्याला शिव्या दिल्या जात असून जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचे कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी आरोप करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. दिल्लीत पोलिसांची संख्या कमी असून त्यांना कारवाईचे आदेशही केंद्र सरकारकडून प्राप्त होत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्याला लगेचच कपिल मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपने इस पूरे भाषण में एक बार भी दिल्ली की बंद सड़कें खोलने की अपील क्यों नहीं की?
मुख्यमंत्री के नाते सड़कें खोलने की अपील कीजिये तुरंत
सड़के बंद करने वाले दंगाइयों को क्यों बचा रहे हैं AAP?
आप दंगाइयों को बचाना चाहते हैं? @ArvindKejriwal https://t.co/IANX3gfo4V
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 25, 2020
अरविंद केजरीवाल यांचा भाषणाचा उल्लेख करत कपिल मिश्रा यांनी केजरीवाल हे दंगलखोरांना वाचवत असल्याचा थेट आरोप केला. मिश्रा यांनी ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी केजरीवाल यांचे भाषणाची व्हिडिओ क्लिप शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील रस्ते सुरु करण्याचे आवाहन का केले नाही ? मुख्यमंत्री म्हणून तात्काळ सर्व रस्ते खुले करण्याचे आवाहन करा. रस्ते बंद करणाऱ्या दंगलखोरांना का वाचवत आहेत AAP ? तुम्ही दंगलखोरांना का वाचवू इच्छिता ? असे प्रश्न मिश्रा यांनी उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्री जी @ArvindKejriwal
आप आज मीटिंग कर रहे हैं, तीन बातों का ध्यान रखिये –
1. अपील कीजिये – शाहीन बाग, जाफराबाद, चांद बाग समेत दिल्ली की सारी सड़के खाली हो
2. CAA विरोधी प्रस्ताव दिल्ली विधानसभा में नहीं आना चाहिए
3. गोलियां चलाने वाले शाहरुख के खिलाफ जरूर बोलिये
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 25, 2020
शिव्या आणि मारण्याची धमकी –
कपिल मिश्रा यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यामध्ये त्यांनी आपल्याला शिव्या आणि जीवे मारण्याची धमकी बाबत माहिती दिली आहे. ओवैसी आपल्याला शिव्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही मोठे पत्रकारही आपल्याला शिव्या देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत असल्याची त्यांची तक्रार आहे. मी दहशतवादाच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याचे धाडस केले हाच माझा गुन्हा असल्याचे ते म्हणाले. दहशतवाद्यांशी सहानभुती असलेले माझा द्वेष करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.