नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरात टोपी आणि रस्त्यावर टिळा लावला जात आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेबाबत बोलायचे आणि दुसरीकडे जातीयवाद निर्माण करायचा. ग्रँड ओल्ड पार्टी असलेल्या काँग्रेसची ही ब्रँड न्यू ओळख बनली आहे. सध्या या पक्षाची स्थिती अशी आहे की, ना त्यांना माया मिळाली ना राम, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंदिर जाण्यावरुन अप्रत्यक्षरित्या त्यांनी ही टीका केली आहे.
राहुल गांधी हे सोमवारी पुष्कर येथील ब्रह्म मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी विधिवत पुजा केली. ब्रह्म मंदिरात जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अजमेरमध्ये १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दग्र्यात जियारतही केली होती. यावरूनच भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे.
नागपूर : नेत्यांची पत घसरल्यामुळेच, आपला खुजेपणा लपविण्यासाठी पुतळ्यांची उंची वाढविल्याची टीका जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शैलक्या व काव्यात्मक शैलीत वर्तमान सरकारचा समाचार घेतला.