‘उध्दव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखे दुर्भाग्य नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी बोलताना भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील, असे म्हटले होते. तोच धागा पकडून भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखे दुर्भाग्य दुसरे नाही. एक शहर सांभाळू शकत नाही. कुबड्यांवर सरकार चालत आहे. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर, फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं करेल,” अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

दरम्यान, वार्ताहरांना बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, सानप शिवसेनेत आल्यावरही फायदा झाला नव्हता. आमचा एकही फुटणार नाही, असे ते सांगत आहेत. मात्र, थोडे दिवस थांबा भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवनच असेल. आता फक्त एकाच पक्षातून येणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पुढचे २०-२५ वर्षे टिकावे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे राजकारण करावे, असे जनतेस वाटत.

कार्यकर्ते जमिनीवर पाय रोवून असतात, तेव्हा नेते येतात की जातात याकडे लक्ष नाही द्यायचं. काही देखील करुन नाशिक महापालिकेवर यंदा भगवा फडकवायचा आहे. त्याचसोबत धुळे महापालिकेवरही आपली सत्ता आणू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.