…मग तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी कशी काय करता ? : विनोद तावडे

विनोद तावडेंचा ऊर्मिला मातोंडकरांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उर्मिला मातोंडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा कांगावा करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि आज त्यांच्या समोरच मोदी मोदी घोषणा देणाऱ्या तरुणांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. मग तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी कशी काय करता? असा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, बोरिवली स्थानकाजवळ उर्मिला मांतोडकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. त्यावेळी मोदी मोदी घोषणा देणाऱ्या तरुणांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. त्यानंतर मातोंडकर यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

दरम्यान, आज सकाळी कॉंग्रेसची प्रचार यात्रा सुरु असताना बोरिवली रेल्वेस्थानकावरील काही कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. पण त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणा-या युवकांना मारहाण केली, यामध्ये युवतीलाही मार लागला. असे विनोद तावडे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर. उर्मिला मातोंडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा कांगावा करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि आज त्यांच्या समोरच मोदी मोदी घोषणा देणाऱ्या तरुणांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. मग तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी कशी काय करता? असा सवालही त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

याचबरोबर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुणे येथील सभेतही मोदी मोदी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी काही प्रतिक्रिया नव्हती. राहुल गांधी यांनी तरुणांनी घोषणा देणे मान्य केले मग हे तुम्हाला आता जड का जाते असा टोलाही त्यांनी लगावला.

इतकेच नव्हे तर, बोरीवलीमधील घटनेत कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजेश निर्मल व अन्य कार्यकर्त्यांनी सामान्य प्रवाशांनाही मारहाण केल्याचे न्यूज चॅनेलच्या फूटेज मध्ये दिसत आहे. त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बोरिवली पोलिस ठाण्यातमध्ये केली आहे. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, ऊर्मिला मातोंडकर यांनी प्रचारासाठी जितके पोलिस संरक्षण हवे आहे, तितके घ्यावे. आवश्यक असल्यास बाऊंसरही ठेवावेत पण याच्या आधारे तुम्हाला मते मिळणार नाहीत. असेही त्यांनी म्हंटले.