भाजपाचा मोठा निर्णय ! शिवसेनेच्या खासदारांबाबत ‘ही’ चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात संसदेत शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलली जाऊ शकते. याला कारणच तसे आहे. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय नेते अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर भाजप मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खासदारांची रवानगी थेट विरोधी बाकांवर केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले की राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलली जाणार असल्याची चर्चा माझ्याही कानावर आहे. परंतू संसदेत शिवसेना खासदारांना अगदी कोपऱ्यात नेऊन बसवले तरी तेथूनही आम्ही आवाज उठवणारच.

यावेळी विनायक राऊत यांच्याकडून एनडीएच्या बैठकीला शिवसेनेला न बोलावल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. मुळात एनडीए बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारातून स्थापन झाली. त्यावेळी शिवसेनेने भाजपला साथ दिल्यानेच भाजपला आधार मिळाला. भाजप एनडीएच्याच निर्मात्यांना बाजूला ठेवत आहे. भाजपला या कर्माची फळे भोगावी लागतील असे देखील विनायक राऊत म्हणाले.

भाजप सरचिटणीस राम माधव यांनी देखील काही दिवसांपूर्वीच संकेत दिले की शिवसेनेला एनडीएचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. यावेळी शिवसेना पुन्हा एनडीएमध्ये परतेल की असा प्रश्न विचारण्यात आला यावर राम माधव यांनी उत्तर दिले की शिवसेनेला पुन्हा एनडीएमध्ये सहभागी करुन घेण्याचा शक्यता फारच कमी वाटते. शिवसनेने आमच्या अनेक नेत्यांवर नाव न घेता टीका केली त्यामुळे पुन्हा समेटाची शक्यता दिसत नाही असे देखील राम माधव म्हणाले.

Visit : Policenama.com