BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Babanrao Lonikar | महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला दिले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याची टीका भाजपाने केलीय. अशातच आता भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी आक्षेपार्ह भाषेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) म्हणाले की, “इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे. ही खोटारडी औलाद सातत्याने सांगत होती की मोदींनी, केंद्र सरकारने आम्हाला डेटा दिला पाहिजे.”

पुढे बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, “मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. दिल्लीत, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. सगळा देश काँग्रेसच्या ताब्यात होता. तेव्हा हा सर्वे झाला होता. त्यामध्ये 69 हजार चुका होत्या. तो डाटा कधीच मनमोहन सिंग सरकारने कुठल्या राज्याला दिला नाही. काँग्रेसने 50 वर्षांच्या हयातीत तो डाटा बाहेर काढला नाही. पण राज्यातले ओबीसी मंत्री देखावा निर्माण करत आहेत. रुमाल गळ्यात घालून भाषणं करत आहेत. माध्यमांत बोलत आहेत”, असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”तुम्ही गावागावात जाऊन सांगा की ही बेईमान औलाद आहे. हिरव्या हराळीमध्ये साप दिसत नाही.
हा महाराष्ट्रातला 3 पक्षांचा विषारी साप किती विषारी आहे हे गावागावात समजावून सांगावं लागेल,”
असं म्हणत बबनराव लोणीकरांनी आघाडी सरकारवर घणाघात केला आहे.

 

Web Title :- BJP MLA Babanrao Lonikar | bjp mla babanrao lonikar targets uddhav thackeray government obc reservation maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा