Video : भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाल्या – ‘शुद्राला शुद्र बोललं, तर वाईट वाटतं’
पोलीसनामा ऑनलाईन : भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर ( MP Pragya Singh Thakur) या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान करून ते चर्चेत आल्या आहेत. मध्ये प्रदेशातील एका जाहीर कार्यक्रमात वर्णव्यवस्थेबद्दल विधान करून त्या वादात सापडल्या आहेत. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटले, तर वाईट वाटते, कारण काय आहे, तर समजत नाही, असा प्रश्न प्रज्ञा ठाकूर यांनी केला. मात्र, त्यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे.
#WATCH | Kshatriya ko kshatriya keh do, bura nahi lagta. Brahmin ko brahmin keh do, bura nahi laga. Vaishya ko vaishya keh do, bura nahi lagta. Shudra ko shudra keh do, bura lag jata hai. Kaaran kya hai? Kyunki samajh nahi paate: BJP MP Pragya Singh Thakur in Sehore, MP (12.12) pic.twitter.com/CbCctxmACp
— ANI (@ANI) December 12, 2020
मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये आयोजित कार्यक्रमात खा. ठाकूर यांनी हे विधान केले आहे. खासदार ठाकूर म्हणाल्या, क्षत्रियाला क्षत्रिय म्हटले तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटले तरी वाईट वाटत नाही, शुद्राला शुद्र म्हटले की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही,” असे विधान त्यांनी केले आहे.
तसेच भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या घटनेवरून खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राज येणार आहे. आपली सत्ता संपुष्टात येणार असल्याची जाणीव झाल्यानेच ममता बॅनर्जी हताश झाल्या असल्याची टिका खा. ठाकूर यांनी केली आहे.