नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे सर्वच हिंसेचा वापर करतात असे म्हणत काँग्रेसने सर्वांवरच सडकून टीका केली आहे . इतकेच नाही तर काँग्रेसने स्वत:वरच स्तुतीसुमने उधळत काँग्रेसने कायमच हिंसेसोबत लढताना अहिंसेचा वापर केला आहे . असेही म्हटले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांचा माईकवर बोलतानाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. यासोबतच त्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यावर निशाणा साधत टीका करण्यात आली आहे.
दरम्यान आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले की , ” भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे नेहमीच हिंसेचा वापर करत असतात . हिंसा हे कमकुवत लोकांचे शस्त्र आहे . काँग्रेसने नेहमीच या हिंसेच्या विरोधात लढा दिला आहे . परंतु काँग्रेसने त्यांच्या या हिंसेविरुद्ध लढताना नेहमीच अहिंसेचा वापर केला आहे.” असे म्हणत काँग्रेसने मात्र स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे.
BJP-RSS and CPM, both use violence. Violence is the weapon of the weak and Congress always fought it with non-violence: CP @RahulGandhi#VaravayiRahulGandhiYugam pic.twitter.com/JuHII5pRto
— Congress (@INCIndia) March 14, 2019