गटनेत्यांच्या बैठकीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधीमंडळात मांडण्याबाबत विरोधकांनी ठाम भूमिका घेतल्याचं दिसून आलं. म्हणूनच विधेयक मांडतांना अडचणी येऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंशी थेट मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. मराठा आरक्षण विधेयकाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच हे विधेयक येत्या २९ तारखेला सभागृहात मांडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. असे असतानाच दुसरीकडे आज मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मांडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात आजही गदारोळ बघयाला मिळाला.
अखेर दिवसभराचं कामकाज पाण्यात गेलं.
आज विधानपरिषदेतल्या गदारोळाच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. घोषणाबाजी झाली पण ते मैत्रीपूर्ण असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अनेक आमदारांच्या चेहऱ्यावरचं हसू कॅमेरात चित्रित झालं. आज सकाळपासून विधानपरिषदेत मागासवर्गीय अहवाल मांडण्याच्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ झाला. वारंवार होणाऱ्या गोंधळानं कामकाज तहकूब होत गेलं. अखेर दिवसभराचं कामकाज पाण्यात गेलं.