BJP vs NCP | राज ठाकरेंना ‘सरडा’ म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला भाजपचं उत्तर; म्हणाले – ‘पहाटे शपथविधी झाल्यानंतर पवारांनी त्याच पुतण्याला…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP vs NCP | गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळावात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी (Sharad Pawar) 1999 मध्ये राष्ट्रवादीची (NCP) स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप केला. यानंतर राष्ट्रवादी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रंग बदलणारा सरडा’ असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. यानंतर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. (BJP vs NCP)
केशव उपाध्ये ट्विट करत म्हणाले की, ”रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवार यांच काय? 1978 मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. 1986 मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा 1999 मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली,” असं उपाध्ये म्हणाले. (BJP vs NCP)
….रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे.
◾️पण @PawarSpeaks यांच काय?
◾️१९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले.
त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.
◾️पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. 1/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 4, 2022
पुढे केशव उपाध्ये म्हणाले, “2014 मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले,” याची आठवण केशव उपाध्ये यांनी करुन दिली. “बरं ते जाऊ द्या. 2019 मध्ये भाजप सोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय कारकिर्दीत किती वेळा रंग बदललेत?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर टीका करताना रंग बदलणारा सरडा असा उल्लेख केला. सरडाही जितक्या वेगाने रंग बदलत नाही तितक्या वेगाने राज ठाकरे रंग बदलत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Web Title :- BJP vs NCP | bjp keshav upadhye on ncp sharad pawar mns raj thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Beed Crime | दुर्देवी ! सेल्फीचा मोह बेतला जीवावर; नवदाम्पत्यासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
Pune Crime | धक्कादायक ! पिंपरीत DTDC कुरिअरने मागवल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान