भाजप घेणार ‘या’ पक्षांची सत्तास्थापनेसाठी मदत ..?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अजून बाकी आहेत आणि आता भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही याची चर्चा रंगू लागली असताना ते कोणत्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतात याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि राम माधव यांनी याची शक्यता वर्तवली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटलं की, ‘भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

‘भाजपने महाराष्ट्र ,झारखंड ,युपी ,बिहार,पंजाब ,आणि तामिळनाडूसह पूर्वोत्तर राज्यांत प्रादेशिक पक्षांसह युती केली आहे . बाकीच्या राज्यांत भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे . २०१४ मध्ये भाजपने २७ पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये भाजपला एकट्याला २८२ जागा तर एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. पण नंतर टीडीपी आणि आरएलएसपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे . भाजपने यूपीमध्ये अपना दल, बिहारमध्ये जेडीयू-एलजेपी, महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, तमिळनाडुमध्ये AIADMK आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षासोबत युती केली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रादेशिक पक्षांनी देखील राज्यात एकमेकांशी युती केली आहे .

कोणत्या पक्षांची भाजप मदत घेऊ शकतो :

१)पहिलं नाव आहे ते आंध्रप्रदेश मधील जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस.यांचा देखील विचार मोदी करू शकतात.
२)तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षावर देखील भाजपची नजर असणार आहे.
३)ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बीजेडी देखील याआधी एनडीएचा मित्रपक्ष होता,त्यामुळे यावेळी गरज पडल्यास मोदी त्यांच्याकडे समर्थन मागू शकतात.
४)भाजपची नजर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर देखील असेल.
५)जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉफ्रेंसवर देखील भाजपची नजर आहे.
६)उपेंद्र कुशवाहा यांचा आरएलएसपी बिहारमध्ये भाजपच्या बरोबर निवडणुकीनंतर जाऊ शकतो .
७)जीतनराम मांझी यांचा हम पक्ष देखील पुन्हा एकदा भाजपमध्ये येऊ शकतो.
८)हरियाणामधील ओम प्रकाश चौटाला यांचा इनेलो पक्षाचा पर्याय देखील भाजपकडे असेल.