अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील आता अहमदनगरमध्ये होणाऱ्या महाजानदेश यात्रेच्या तयारीला लागले आहेत. २४ ऑगस्ट रोजी शहरात जाहीर सभा होणार आहे, त्याच्या नियोजनासाठी मंत्री विखे यांच्या उपस्थितीत शहरात भाजपाची बैठक पार पडली.
विखे पाटील यावेळी म्हणाले की, महाजानादेश यात्रा दोन दिवस नगर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात होणार्या सर्व सभा भव्यच होणार आहेत. नगर शहरातही सभा होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे, दिलीप गांधी व मी यासाठी नियोजन करत आहोत. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्याची पायाभरणी या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून होणार असल्याचे विखे यांनी कार्यकर्त्याना सांगितले.
‘अबकी बार २२० पार’अशी घोषणा भाजपाने केली आहे. हे यश भाजप मिळवणारच असून, यात नगर जिल्हा पूर्ण सहभागी असणार आहे. जिल्ह्यातील सर्व १२ जागा भाजप जिंकणार आहे, असा दावा यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यावेळी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा संपूर्ण राज्यात जात आहे. नगरमध्ये या यात्रेचे जोरदार स्वागत आपल्याला करायचे आहे.
- कारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या