काश्मीरमधील कलम 370 अन् तब्बल 500 वर्षांपासूनचा राममंदिराचा प्रश्न PM नरेंद्र मोदींनी सोडविला

पोलीसनामा ऑनलाइन : देशातील काश्मीरमधील कलम 370 चा प्रश्न, 500 वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिर प्रश्न आदी गुंतागुंतीचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडविले आहेत, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी केले. तसेच पुराणिक म्हणाले की, कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर खूप महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पक्ष दखल घेत आहे. भविष्यात त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल.

शेवगाव तालुका भाजपच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, सुभाष गायकवाड, राहुल जामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अशोक आहुजा, गणेश कोरडे, कमलेश गांधी, सागर फडके, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, दिगंबर काथवट आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि भाजपची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार आणि केंद्रातील मोदी सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहाेचविण्याचे काम करावे. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भीमराज सागडे यांनी केले, तर भाजपचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांनी आभार मानले.