पुन्हा एकदा निलेश राणेंची शिवसेनेवर ‘टीका’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इंस्टीट्युटच्या कार्यक्रमात मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कमीत कमी आमदार असताना देखील राज्यात सरकार असे बनवले जाऊ शकते हे शिकवले आहे असे विधान केले होते. मात्र विरोधी पक्षातील काही लोकांना हे विधान चांगलेच बोचल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दात टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी ठाकरे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत निलेश राणे यांनी ट्विट केले आहे त्यामध्ये ते म्हणतात, हा माणूस स्वर्गीय बाळासाहेबांना विसरला आहे. ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक घडवला त्यांचाच मुलगा त्यांना विसरून रोज पवार साहेबांचे गुणगान गातोय कारण सोपं आहे पवार साहेब नसते तर हे मातोश्री बाहेर गोट्या खेळत बसले असते अशा शब्दात निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

ज्याप्रमाणे कमीत कमीत जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्याचप्रमाणे शरद पवार हे कमीत कमी आमदारांमध्ये सरकार असे बनवायचे हे करून दाखवतात, त्यामुळे जागा जास्त असणाऱ्यांनी आमचाच पीक जास्त येणार असे समजू नहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला होता.

 

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/