सांगलीच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह उदगावात आढळल्याने प्रचंड खळबळ

जयसिंगपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली शहरातील शिवराजनगर येथून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या काठावर आढळून आला. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. हा घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वैभव बाळकृष्ण माळी (वय 22) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण माळी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. वैभव हा शनिवार (दि.27) पासून घरातून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटूंबियांनी सांगली शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.