जेव्हा हृतिक रोशनला लग्नासाठी आले होते तब्बल 30 हजार ‘प्रपोजल’ ! पहिल्याच सिनेमानं घातला होता ‘धुमाकूळ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) हँडसम हंक अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या डेब्यू सिनेमातूनंच त्यानं इंडस्ट्रीत राडा घातला होता. आता अशी माहिती आहे की, लवकरच रामायण मध्ये तो रामाचा रो प्ले करणार आहे. तुम्हाला माहित आहे का, हृतिकचा पहिला सिनेमा कहो ना प्यार है रिलीज झाला होता तेव्हा त्याला लग्नासाठी 30 हजार प्रपोजल आले होते.

द कपिल शर्मा शो मध्ये सिनेमाच्या प्रमोशनला आल्यानंतर हृतिकनं याबाबत माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, कहो ना प्यार है सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला लग्नासाठी 30 हजार प्रपोजल आले होते. या सिनेमाच्या यशानंतर हृतिक रातोरात स्टार झाला होता.

नंतर त्यानं त्याची लहानपणीची मैत्रीण सुजैन खान सोबत लग्नगाठ बांधली होती. 13 वर्षांनंतर म्हणजेच 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुल आहेत. रिहान आणि रिधान अशी त्यांची नावं आहेत.

कहो ना प्यार है सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात हृतिकनं डबल रोल साकारला होता. अमीषा पटेलंन यात प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाला आयफाचा स्पेशल अवॉर्डही मिळाला होता. हृतकिचा हा सिनेमा त्याचे वडिल राकेश रोशन यांनी डायरेक्ट केला होता. विविध पुरस्कार सोहळ्यात या सिनेमा एकूण 90 पुरस्कार मिळाले होते जो एक रेकॉर्ड होता.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता. आता लवकरच तो फायटर सिनेमात दिसणार आहे. इतकंच नाही तर तो निर्माता मधु मेंटाना चा ड्रीम प्रोजेक्ट रामायण मध्येही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण लिड रोलमध्ये असणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. यासाठी मधु 300 कोटी खर्च करणार आहे. नितीश तिवारी हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत. नितीश यांनी याआधी आमिर खानचा दंगल आणि सुशांत सिंह राजपूत व श्रद्धा कपूर स्टारर छिछोरे हे सिनेमे डायरेक्ट केले आहेत.