सौरव गांगुलीनं ‘शाहरुख खानवर केले ‘आरोप’, KKR च्या कप्तानीबाबत सांगितलं ‘असं’ काही, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे माजी कर्णधार यांनी शाहरुख खान वर आरोप करत म्हटले की त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांना निर्णय घेण्यासाठी फ्री हॅन्ड मिळाला नव्हता. सौरव गांगुली यांनी वर्ष 2008 आणि 2010 मध्ये शाहरुख खानची आईपीएल टीम कोलकाता नाइट राइडर्सचे कर्णधार म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमला विजयाकडे नेणे शक्य झाले नसले तरी टीमला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

तथापि, नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने केकेआरचे कर्णधार असताना आपल्या कारकिर्दीविषयी काही धक्कादायक खुलासे केले. आता एसआरकेच्या मालकीच्या टीमचे कर्णधार असलेले गौतम गंभीरची मुलाखत दादांनी आठवली आणि म्हणाले की, त्यांना फ्री हॅन्ड देण्यात आला आहे. परंतु जेव्हा त्यांनी याबाबत मागणी केली होती तेव्हा त्यांना मिळाला नव्हता.

https://www.instagram.com/p/CCdp8q4Bvsn/?utm_source=ig_embed

गौतम भट्टाचार्य यांना दिलेल्या मुलाखतीत दादा म्हणाले की, ‘मी एक मुलाखत पहात होतो तिथे गौतम गंभीर म्हणाले की शाहरुख खानने चौथ्या वर्षात त्यांना सांगितले होते की ही तुमची टीम आहे, मी हस्तक्षेप करणार नाही. मी असे करण्यास सांगितले असता त्यांनी मला नकार दिला होता.’ ते पुढे म्हणाले, ‘आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट टीम त्याच आहेत ज्यांना खेळाडूंवर सोपवण्यात आले आहे. सीएसकेकडे पहा, एमएस धोनी या टीमला चालवतात. मुंबईतही कोणी रोहित शर्माकडे जात नाही आणि त्याला खेळाडूंच्या निवडीबद्दल सांगत नाही.’

आपले पुस्तक ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ’ मध्ये सौरव गांगुलीने केकेआरबरोबरच्या त्यांच्या कारकिर्दीबाबतचा उल्लेख केला आहे आणि तिसर्‍या सीझनमध्ये मालक शाहरुख खान यांच्याशी सतत संपर्कात होते आणि आपली टीम निवडण्याबाबत इच्छा व्यक्त करत होते. पुस्तकाच्या एका उताऱ्यात लिहिले आहे, ‘मी त्यांच्या (शाहरुख) सतत संपर्कात रहायचो आणि सीझनमध्ये तीनपेक्षा अधिक वेळा एक वेळ शेवटच्या अकरा विषयी निर्णय घेताना त्यांची सहमती घेत असायचो. जे भारतीय इलेव्हनची निवड करताना मी कधीच केले नव्हते.’ त्याऐवजी त्यांनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.