मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस रवीना टंडन, कोरियोग्राफर फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांच्या अडचणीत वाढ होणार आहे असं दिसत आहे. कारण गेल्या वर्षी तिघाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीनं आता महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहित त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तक्रारदार आशिष शिंदे यांनी आपल्या मागणीला घेऊन मंगळवारी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे अर्ज दिला आहे. गेल्या वर्षी एका कॉमेडी शोमध्ये हे प्रकरण समोर आलं होतं. यात एका शब्दाला घेऊन कॉमेडी करण्यात आली होती.
महासंचालकांना दिलेल्या अर्जात आशिष शिंदे म्हणतात, “या प्रकरणी आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बीडच्या पोलीस अधीक्षकांना सर्वा आरोपींना अटक करण्याचे निर्देश देण्यात यावेत.”
स्थानिक एनजीओचे प्रमुख आशिष शिंदे यांनी गेल्या वर्षात बीड शहराच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फराह खान, रवीना टंडन आणि भारती सिंह यांच्याविरोधात कलम 295 ( धार्मिक भावना दुखावणं) नुसार तक्रार दाखल केल होती. त्यांनी आरोप केला होता की, पूर्ण जग डिसेंबरमध्ये ख्रिसमस साजरा करत होतं. परंतु 3 बॉलिवूड कलाकारांनी Hallelujah(ईश्वराचं कौतुक करणं किंवा आनंद व्यक्त करणं) शब्दाची बँक बेंचर्स नावाच्या शोमध्ये खिल्ली उडवली. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की, हे प्रकरण मुंबईतील मालाड ठाण्यात वर्ग करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण ?
गेल्या वर्षी क्रिसमसमध्ये एका कॉमेडी शो दरम्यान हालेलुया शब्दाला घेऊन फराह खान आणि भारती सिंह असं काही म्हटलं की, त्यांच्यासाठी अडचण निर्माण झाली. याच कार्यक्रमात रवीना टंडनदेखील उपस्थित होती. परंतु यानंतर तिघींनीही कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियाची माफी मागितली होती. परंतु हे प्रकरण काही केल्या शांत होत नाही असं दिसत आहे.
Please do watch this link. I haven't said a word that can be interpreted as an insult to any religion. The three of us (Farah Khan, Bharti Singh and I) never intended to offend anyone, but in case we did, my most sincere apologies to those who were hurt. https://t.co/tT2IONqdKI
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 26, 2019