जाणून घ्या करण जोहरनं PM मोदींना का लिहिलं पत्र ? सोशल मीडियावर ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विशेष पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की बॉलिवूड देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यावर एक विशेष चित्रपट बनवेल. करण जोहर यांनी या मोहिमेची माहिती पंतप्रधान मोदींना सविस्तर दिली आहे.

करणने लिहिले, ‘पंतप्रधान मोदीजी आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की आम्ही या महान देशाच्या कथा जगासमोर मांडणार आहोत. आता स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याचा उत्सव साजरा केला जाईल.’ करणने पुढे लिहिलं, ‘Change Within’ मोहिमेअंतर्गत फिल्म इंडस्ट्री अशा कथा दाखवणार आहे ज्यामध्ये देशाची संस्कृती आणि शौर्य दाखविले जाईल. कथांनीच आपल्याला बनवले आहे. राजकुमार हिरानी यांनी गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक चित्रपट बनविला होता. आता आम्ही स्वातंत्र्याच्या उत्सवासाठी काही मोहिमांमध्ये स्वतःला सामील करणार आहोत.

https://twitter.com/karanjohar/status/1311964112939753473?s=19

करण लिहितात, ‘आता अशा कथा दाखविल्या जातील ज्या भारताच्या आत्म्याला दर्शवतील. या मोहिमेमध्ये तुमच्या सहकार्याची अपेक्षा बॉलिवूडला आहे.’ मी आपल्याला सांगू इच्छितो की या मोहिमेत एकता कपूर, रोहित शेट्टी, साजिद नाडियालवाला यांच्यासह अनेक दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सहभागी आहेत. या सर्वांच्या वतीने करण जोहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

फॅन्स करत आहेत कौतुक
या मोहिमेचा एक भाग म्हणून करण जोहरचे चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- ग्रेट स्टार्ट. तसेच दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले- स्वातंत्र्य साजरे करणे ही एक चांगली कल्पना आहे. एका फॅनने लिहिले की – ब्रिलियंट अभियान.