छोट्याशा गोष्टीमुळं ‘या’ 6 बड्या सिनेमांवर पडलं पाणी, आधी झाली जोरदार चर्चा, नंतर झाले ‘डब्बा बंद’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमध्ये काही बडे मकर्स आणि सुपरस्टार असे आहेत ज्यांच्या सिनेमाची आधी तर खूप चर्चा झाली. परंतु हे सिनेम कधी पूर्ण झाले नाहीत. असे काही सिनेमे जे अर्ध्यात बंद पडले आहेत. याच बद्दल जाणून घेऊयात.

1) पानी –  सुशांत सिंह राजपूतचा पानी हा सिनेमा खूप चर्चेत होता. शेखर कपूर डायरेक्टेड सिनेमात सुशांत लिड रोल मध्ये होता. त्यानं सर्व तयारीही केली होती. परंतु शेखर कपूर आणि प्रोड्युसर आदित्य चोपडा यांच्यात कशावरून वाद झाला आणि यशराज बॅनरनं हात वर केले. सिनेमाचं काम अचानक बंद झाल्यानं सुशांतही खूप दु:खी झाला होता.

2) इंशाअल्लाह –  संजय लीला भन्साळींच्या या सिनेमा सलमान खान आणि आलिया भट पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. गेल्या वर्षी घोषणा झालेल्या या सिनेमाच्या स्टोरीवरून सलमान आणि भन्साळी यांच्यात काही बिनसलं आणि सिनेमा बंद पडला.

3) दस –  हा सिनेमा अंडर प्रॉडक्शन असतानाच बंद झाला होता. सिनेमाचे डायरेक्टर मुकुल एस आनंद यांचं 1997 मध्ये अचानक निधन झालं. सिनेमात सलमान खान, संजय दत्त, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा तर रिलीज नाही झाला. परंतु 1999 मध्ये सिनेमातील गाणी रिलीज झाली होती.

4) टाईम मशीन –  शेखर कपूरच्या सायंस फिक्शन सिनेमा टाईम मशीनमध्ये आमिर खान, रवीना टंडन, नसीरुद्दीन शाह, रेखा आदी लोक लिड रोलमध्ये होते. आर्थिक तंगीमुळं हा सिनेमा मध्येच बंद पडला.

5) शुबाईट –  अनेक वर्षांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी शुजित सरकारच्या शुबाईट सिनेमावर काम केलं. परंतु सिनेमावरून युटीव्ही, डिझनी मध्ये वाद सुरू आहे. यामुळं हा सिनेमा आजवर रिलीज होऊ शकला नाही.

6) परिणाम –  अक्षय कुमार आणि दिव्या भारती यांनी हा सिनेमा साईन केला होता. 1993 मध्ये सिनेमाची शुटींग सुरू होणार होती. परंतु याच वर्षी दिव्या भारतीचं निधन झालं. नंतर हा सिनेमा कधी तयार होऊ शकला नाही.