फराह खान, रविना टंडन आणि भारती सिंह यांच्याविरुद्ध FIR, लावला ‘हा’ मोठा आरोप

मुंबई : वृत्त संस्था – बॉलिवुड अ‍ॅक्ट्रेस रविना टंडन, चित्रपट निर्माता फराह खान आणि कॉमेडियन भारती सिंह यांनी असे काही केले आहे की त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तीन प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात पंजाबात एफआयर दाखल करण्यात आली आहे. या तिघींचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये या तिघींनी असे काही म्हटले आहे की, ज्यामुळे लोकांना राग आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली आहे. लवकरच या तिघींवर कारवाई सुरू केली जाणार आहे.

रविना, फराह आणि भारतीवर अमृतसरच्या अजनालामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. द ट्रिब्यूनच्या बातमीनुसार या तिघींवर एका कार्यक्रमात लोकांच्या धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कार्यक्रमात या तिघींनी ईसाई धर्माबाबत असे भाष्य केले ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच धर्माचा अपमान झाला आहे. हा कार्यक्रम ख्रिसमसच्या दिवशीच प्रसारित झाला आहे.

पोलिसांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ तपासून, भादवि, कलम 295 नुसार गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणी या तिघींपैकी कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासंबंधीच्या बातमी हेदेखील म्हटले आहे की, एसएसपी विक्रम जी दुग्गल यांनी या तक्रारीस दुजोरा दिला आहे. यापूर्वी फराह खान, बिग बॉस 13 ची होस्ट होणार असल्याच्या चर्चेत होती, परंतु, नंतर तिने हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते. तर रविना टंडन सीएए आंदोलनादरम्यान एक कार्टून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ट्रोल झाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/