गीतकार’ जावेद अख्तर बनवणार ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचं बायोपिक ! स्वत:च केलं शिक्कामोर्तब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) फेम ड्रामा क्वीन ॲक्ट्रेस राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या उलट सुलट वक्तव्यानं कायमच चर्चेत येत असते. याशिवाय वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हेही तिच्या चर्चेत राहण्याचं एक कारण आहे. बिग बॉस 14 मध्ये तिनं लोकांचं खूप मनोरंजन केलं आणि लक्ष वेधलं. अलीकडेच राखीकडून असा दावा केला गेला होता की, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांना राखीचा बायोपिक सिनेमा बनवायचा आहे. आधी तर हे ऐकून लोक अवाक् झाले होते. परंतु खुद्दा जावेद अख्तर यांनीच राखीच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

राखी सावंतचा दावा खरा असल्याचं सांगत जावेद अख्तर यांनी सांगितलं की, ते खरचं राखीचं बायोपिक बनवणार आहेत. त्यांच्या तिच्या आयुष्यावर स्क्रिप्ट लिहायची आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, हे खरं आहे की, मी तिच्या (राखीच्या) आयुष्यावर सिनेमा बनवणार आहे. 4-5 वर्षांपूर्वी आम्ही एकाच फ्लाईटमधून प्रवास करत होतो. तेव्हा तिनं तिच्या बालपणाबद्दल सांगितलं. तेव्हा मी विचार केला होता की, एके दिवशी तिच्या आयुष्यावर स्क्रिप्ट नक्कीच लिहिल.

राखीनं केला होता दावा
अलीकडेच राखीनं एका मलाखतीत बोलताना असा दावा केला होता की, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर तिच्या आयुष्यावर सिनेमा बनवू इच्छित आहेत. त्यांनी अलीकडेच तिला कॉलही केला होता. एक मीटींग फिक्स करण्याबद्दलही ते बोलले होते ज्यात ते बायोपिकवर चर्चा करणार होते.

राखी असंही म्हणाली होती की, माझं आयुष्य खूप वादग्रस्त राहिलं आहे. लोकांना हे पहायला आवडेल की नाही हे माला नाही माहित.