3 फ्लॅट्स मर्ज केल्याच्या आरोपावर कंगना राणावतने तोडले मौन, पोस्ट शेअर करत स्पष्ट केली आपली भूमिका
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत, ज्यात म्हंटले जात होते कि, तिने तीन फ्लॅट्स एकामध्ये मर्ज केले होते. जे खार भागात असलेल्या 16 मजल्याच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होते. मुंबईतील दिवाणी कोर्टाने सांगितले की, रनौतने मुंबईत आपले तीन फ्लॅट विलीन करताना मंजूर योजनेचे उल्लंघन केले. त्याच वेळी, या आरोपावर अभिनेत्रीने दावा केला आहे की, ही इमारत अशा प्रकारे बांधली गेली होती की प्रत्येक मजल्यावर एक अपार्टमेंट असावे, जेव्हा त्यांनी ते विकत घेतले तेव्हा ते असेच होते. त्या बदल्यात अभिनेत्रीने आरोप केला की, बीएमसी तिला त्रास देत आहे. याबद्दल पोस्ट सामायिक करुन कंगनाने आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.
Fake propaganda by Mahavinashkari government, I haven’t joined any flats, whole building is built the same way, one apartment each floor, that’s how I purchased it, @mybmc is only harassing me in the entire building. Will fight in higher court 🙏 https://t.co/4VBEgcVXf3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 2, 2021
कंगना रनौतने ट्वीट करताना लिहिले, ‘ महाविनाशकारी सरकारचा फेक प्रपोगंडा, मी कोणतेही फ्लॅट मर्ज केले नाहीत, संपूर्ण इमारत अशीच होती, प्रत्येक मजल्यावर एक अपार्टमेंट, मी ती तशीच विकत घेतली होती. संपूर्ण इमारतीत बीएमसी मलाच त्रास देत आहे. मी उच्च न्यायालयात लढेन.
दरम्यान, कंगना रनौतचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी कोर्टात सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या नोटिसात उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या बाबींचा स्पष्ट उल्लेख नाही. यानंतर बीएमसीतर्फे बाजू मांडणारे वकील धर्मेश व्यास म्हणाले की, कंगना रनौत यांना नोटीस बजावण्यापूर्वी बीएमसीने कंगनाच्या घराच्या पाहणीसाठी अभियंता पाठविला होता. सर्वेक्षणानंतर अभियंत्याने 8 मार्गांनी बीएमसीच्या कायद्याचे उल्लंघन करण्याबाबत म्हंटले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापालिकेने वांद्रे येथील कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर म्हणून पाडला होता. 9 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने तो तोडण्यापासून रोखले.