PM मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटनं बॉलिवूडमध्ये ‘खळबळ’, दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 2 मार्च 2020) रात्री असं ट्विट केलं ज्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पीएम मोदींनी ट्विट केलं की, ते सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निरोप घेण्याचा विचार करत आहेत. मोदींनी या ट्विटनं साऱ्यांनाच चकित केलं आहे. ट्विटरवर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही मोदींच्या या निर्णयानं अवाक् झाले आहेत. त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय होतं मोदीचं ट्विट ?
सोमवारी रात्री जवळपास 10 च्या आसपास मोदींनी ट्विट केलं होतं. मोदी म्हणाले होते, “या रविवारपासून फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्युबवरील आपले सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा विचार करत आहे. तुम्हाला माहिती देत राहिल.” यानंतर त्यांनी कोणतंही ट्विट केलं नाही. मोदींचं हे ट्विट खूप व्हायरल होताना दिसलं.

बॉलिवूडमध्ये खळबळ
कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेलनं बाहुबली 2 चा सीन शेअर करत लिहिलं, “मोदीजींनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताची स्थिती अशी होईल.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1234520655711784961

फिल्म मेकर विवेक अग्निहोत्री म्हणतो, “असं असेल तर हा एक मास्टर स्ट्रोक आहे. माोदी एक रचनाशील आणि विचारशील नेते आहेत. नेहमीच अद्वितीय विचार घेऊन येत असतात. नेहमीच एक अजेंडा घेऊन येत असतात. विरोधकही याला नकार देऊ शकत नाहीत.”

https://twitter.com/vivekagnihotri/status/1234517124057452544

रणवीर शौरी म्हणतो, “ट्विटर अनेकदा प्रभावित करतं. इथं राहणं थकवा देणारं ठरू शकतं. एक ब्रेक घ्या. ही वेळही जाईल.